Saturday, August 1, 2009

म्हणून..

विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली
म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची..

अशा क्षणाला..

अखेर माझे जीवन म्हणजे माझे कळणे,
तीमिरही माझा दिवाही माझा माझे जाळणे.

परंतु केव्हा अशा क्षणाला
लाख गवाक्षे भवती खुलती
उचलुनी घेती रस्त्यावरूनी
प्रकाश काही काही माती

आणि पुन्हा विवरात चालते जुनेच जाळणे
परंतु त्या ज्वलनात उमलते नवीन कळणे.....